शिवाजी महाराज – एक लक्ष फुलांचा अभिषेक

पन्हाळ गड काबिज करण्याची मोहीम कोंडाजी फर्जंद यांच्यावर महाराजांनी सोपवली.सोबतीला अण्णाजी दत्तो अणि मोत्याजी मामा रवळेकर हे देखील होते. अवघ्या 60 स्वारा नीशी कोंडाजीनी पन्हाळ गड फत्ते केला.

ही विजयाची बातमी शिवाजी राजांना समजल्यावर शिवाजी राजे जातीने पन्हाळगड पाहन्यास आले. गड फिरत असताना महाराजांची दृष्टिस् एक मंदिर दिसले (महादेवाचे मंदिर ते ) जवळ जाताच तिएक चाफ्याचे झाड़ होते, तेथील एक लक्ष चाफ्याच्या फूलांनी महादेवास महाराजांनी अभिषेक करण्याचा हुकुम दिला.

हे जर समकालीन लोकांनी नोंद करुन ठेवले नसते तर आज आपल्या सारख्या पामराना हे कसे काय समजले असते.

image

संभाजी महाराज – आता हे हिंदू राज्य झाले आहे

गोव्यातील हडकोळण प्रांतातील अंत्रुज येथील शिलालेखात एक वाक्य आले आहे. हा शिलालेख संभाजी राजांनी करवुन घेतला होता. यातील एक वाक्य संभाजी राजांची हिंदू धर्मा विषयी ची धारणा काय होती हे स्पष्ट करणारे आहे.

मुसलमानी अमल असताना त्या प्रांतात कर घेतला जात होता. संभाजी राजे यानी फोंडयाचा अधिकारी धर्माजी नागनाथ यास 22 मार्च 1688 रोजी कळवले आता हे ” हिंदूराज्य ” झाले आहे त्यामुळे येथील सगळे कर आता त्वरित बंद करावेत.

अरे बापरे संभाजी राजांनी हिंदू हा शब्द वापरलाय किती घोर अन्याय केला आहे त्यांनी आतच्या फेक्युलर आणि फुरोगामि म्हणवून घेणार्यांवर. घोर अन्याय घोर अन्याय

image

गरुड भरारी…!!!

प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेड मोहिमेवर असताना केलेला प्रवास पहिला तर मन थक्क होतं. दळणवळणाची आजच्यासारखी साधने उपलब्ध नसताना, आजच्या सारखे express highway नसताना, केवळ आपल्या नजरबाजांवर, हेरांवर पूर्ण विश्वास ठेऊन भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मोहिमा आखण म्हणजे ह्या वीरांच्या युद्धकौशल्याची परिसीमाच म्हणायची…!

केवळ जीवाभावाच्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन मोठमोठ्या लढाया मारणारे बाजीराव पेशवे ह्यांनी  पालखेडच्या  लढाईत निजामाला पाठलागावर ठेऊन, झुकांड्या देऊन पालखेड ला गाठून सपशेल पराभूत केले. सच्चा शिपायाला जात नसते, आपल्या राजाच्या चरणी निष्ठा आणि आपल्या राज्यावर वक्र दृष्टी टाकणाऱ्या शत्रूला रणांगणात धूळ चारणे या दोनच गोष्टी त्यांना माहित असतात. “मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम” या पुस्तकातील पालखेड युद्धा दरम्यानच्या मराठी फौजेच्या घोड दौडीच्या या नोंदी बघितल्या कि  थोरल्या बाजीराव पेशवे (राया, राऊ ) यांचा पराक्रम जातीत तोलणाऱ्या “विचारजंतांची” कीव येते.

Rau

संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

अभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’

शिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे.

। चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम ।

अशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, अर्थ काय तर जसे व्यासांनी “महाभारत” रचून भरत वंशाच्या राजांची कहाणी मांडली तशीच योजना मनी बांधून कविन्द्रांना शिवाजी महाराजांचे चरित्र “शिवभारत” रुपात लिहावयाचे होते. या सदरात आपण याच बहुमोल ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. रचना समकालीन असल्याने त्याचे महत्व अमोल आहे. या ग्रंथातील अनेक नोंदी, वर्णने आणि प्रसंग आपण या सदरात अभ्यासणार आहोत.

सुरुवात करूया एका वादग्रस्त विशेषणाने – “गोब्राम्हणप्रतिपालक”

आजकाल ब्राम्हणांना शिव्या देणे म्हणजे Fashion झाली आहे, त्यामुळेच गोब्राम्हणप्रतिपालक हे विशेषण शिवछत्रपतींना कुणी लावले जर काही विघ्न संतोषी लोक आगपाखड करतात. शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते, ती तुमच्या आमच्या सारखी सामान्य व्यक्ती नव्हती. जनतेचा प्रतिपाळ करणारा तो एक प्रजापालक राजा होता. त्याच्या रयतेत सर्व सामील होते. ब्राम्हण एका गावात हाकलून देवून आणि ते गाव स्वराज्याच्या सीमेबाहेर ढकलून त्यांनी राज्य केलेले नाही. एरवी शिवभारत हा समकालीन आधार मानणारे स्वयंघोषित इतिहासकार आणि जिज्ञासू मात्र त्यातच असणारया ह्या विशेषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष कसे करू शकतात ?

तर हा आहे स्पष्ट आणि समकालीन शिवाजी राजे यांचा गोब्राम्हणप्रतिपालक असलेला उल्लेख –

शिवभारत - गोब्राम्हणप्रतिपालक

शिवभारत – गोब्राम्हणप्रतिपालक

उल्लेख पहिल्या अध्यायात १५ व्या श्लोकात असून, काशीनिवासी श्रोते मंडळी हे कविन्द्रांना विनवणी करताना शिवाजीराजांना जी विशेषणे वापरतात त्याची इथे नोंद घ्यायची आहे. इथे ब्राम्हण या जातीचा उदो उदो नसून सत्य ते मांडण्याचा हेतू आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण पुढे चुकल्यावर जिवाजी विनायकाला ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? असा करडा सवाल करणारे सुद्धा हेच शिवछत्रपति होते. तेव्हा जातीच्या रकान्यात ह्या राजाला न अडकवता एखाद्या आई प्रमाणे प्रजेची काळजी, सांभाळ आणि वेळी कान-उघडणी करणारा व्यक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे.

बहुत काय लिहिणे, तरी आपण सुज्ञ असा !

शिवाजी महाराज- हिंदू आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

शिवाजी महाराज – हिंदुंचा आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

वरील वाक्य हे शिवाजी महाराज आणि बुंदेल खंडाचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्या भेटिच्या दरम्यानचे आहे.

छत्रसाल बुंदेला हा ज्यावेळी शिवाजी राजांना भेटण्यास आला त्यावेळी त्यांच्यात जे संभाषण झाले ते छत्रसाला कड़े आश्रित असणारा ‘लालकवी ‘ याचे मूळ नाव गोरेलाल याने टीपुन ठेवले होते. छत्रसाल याच्या आज्ञेवरुन लालकवी ने छत्रप्रकाश नावाचा ग्रंथ लिहला यात हे संभाषण आले आहे.

हे सांगण्याचा मूळ मुद्दा असा वरील वाक्य नीट वाचले की समजून येते,शिवाजी महाराजांची स्वराज्या प्रति धारणा नक्की काय होती शिवाय याच आशयाचे एक पत्र त्यांनी व्यंकोजी राजांना पण पाठवलेले उपलब्ध आहे. नाहीतर आजकाल नको नको ती लेबल शिवाजी राजांना लावन्याचे कार्यक्रम सरास सुरु आहेतच.

water marks

 

शंभूछत्रपतींची संत तुकोबांच्या पुत्राला मोइन

शिवाजी राजांनी संत आणि धर्माचे ज्याप्रमाणे रक्षण आणि प्रतिपालन केले, तोच वारसा पुढे शंभू छत्रपतींनी चालवला.
तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा यांना दिलेली ही वर्षासनाची मोइन ह्याचे उत्तम उदाहरण आहे.  पत्र १९ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले असून, मायना शिवराज्याभिषेकानंतर वापरण्यात आलेल्या पत्रांसारखाच आहे.
पत्रात देहू, तुकोबा गोसावी आणि त्यांचे पुत्र महादोबा गोसावी असे स्पष्ट उल्लेख आहेत.

water marks 2

 

शिवाजी महाराज – “हिंदू सेनाधिपति”

हेन्री रेविंगटन चे शिवाजी महाराजांना हिंदू सेनाधिपती म्हणून संबोधणारे पत्र

गेल्या 150 वर्षांमधे शिवाजी महाराज हे कसे आपल्या विचारांचे होते हे सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. यात अमुक समाजाचा शिवाजी, तमुक समाजाचा शिवाजी झाले ! अलीकडच्या काळात तर डावे-उजवे सर्वच विचारधारांचे लिहून झाले आहे.

पण शिवाजी राजांचा संबध हिंदू या शब्दाशी जोडला गेला तर जणू काय खुप मोठे संकट येणार आहे असा आविर्भाव तथाकथित फुरोगामि, फेक्युलर आणतात. पण सत्य हे सत्यच असते, अश्या सर्व फेक्युलर-फुरोगामि लोकांनी खालील पत्रातील उल्लेख वाचावा.

इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो
– “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), म्हणजेच त्याकाळी  देखील इंग्रजांची धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत !

जे त्या इंग्रजाना समजले ते आताच्या फुरोगामि आणि फेक्युलर लोकांना समजत नाही !! दुर्दैव !  दुसरे काय ?

 

water marks3

%d bloggers like this: