श्री शिवभारत

शिवभारत अथवा अनुपुरण अथवा सुर्यवंश नावाचा हा ग्रंथ शिवचरित्राच्या अभ्यासाकरिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. रचयिता कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हा शिवसमकालीन असून राजापूर येथे झालेल्या एका महत्वाच्या धर्मपरिषदेत गागाभट्टसह इतर प्रमुख पंडितात कविन्द्रांच्या नावाचा उल्लेख आहे. आग्रा भेटी दरम्यानही कवींद्र उपस्थित असल्याची नोंद आहे. ग्रंथात कालानुरूप शेवटची आलेली ऐतिहासिक नोंद म्हणजे सिद्दी जौहरचा मृत्यू म्हणजे आज उपलब्ध असलेला ग्रंथ हा त्या घटनेच्या आस पास पूर्ण झाला. पूर्ण म्हणताना अयोग्य ठरेल कारण ग्रंथ अपूर्ण आहे असे दिसते.  ३१ अध्याय पूर्ण असून ३२व्या अध्यायात ९ श्लोक आहेत. पुढील ग्रंथ पूर्ण झाला की अपूर्ण राहिला की रचनाकर्त्याचा जीवनकाळ संपला हे पुराव्या अभावे सांगणे अवघड आहे. तर असा हा सर्वोपयोगी ग्रंथ आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. सर्वांकरिता सादर.

|| श्रीशिवभारत || – समकालीन – कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर

शिवाजी राजे – हुजूर बाजारामधे थोर थोर साहूकार आणोन ठेवावे

राजाला स्वताचे राज्य चालवताना किती बारीक़ बारीक आघाड्यांवर लक्ष ठेवावे लागते याचा उत्तम आदर्श शिवाजी राजांनी घालून दिलेला आहे.आपल्या राज्यात सावकार लोकांबद्दल आणि दुसऱ्या राज्यातील सावकार यांच्या बद्दल कशी वागणूक ठेवावी हे वरील उल्लेखात दिलेच आहे.

image

अभ्यास शिवभारताचा – ३ – शिवाजीराजांच्या बाल लीला

कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांनी शिवाजीराजांच्या बाल लीला अतिशय सुंदर शब्दबद्ध केल्या आहेत. शिवाजी राजे लहान पणी मातीची उंच शिखरे बनवून घेत असत आणि आपल्या सवंगड्याना म्हणत असत हे “हे गड माझे आहेत”. ह्या सारख्या अनेक बाल-लीला आहेत ज्या वाचून इतिहास प्रेमी रसिकांना सुमारे ३८० वर्षापूर्वीच्या बाळ लीलांचा अनुभव येईल.

शिवभारत - शिवरायांच्या बाल लीला

शिवभारत – शिवरायांच्या बाल लीला

शिवाजी राजे – गडावरील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे

किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे

image

शिवाजी राजे – देशदुर्गाचे संरक्षणाचे कारण हुजुरात आहे, ज्याचे पदरी बळकट हुजुरात नाही ते सत्तापराधीन

आपल्या जवळील खास सेवक,अधिकारी,सैन्य यान बद्दल शिवाजी महाराज यांना किती विश्वास होता हे वरील वाक्यातून स्पष्ट होते.

image

शिवाजी राजे – धर्मास विरुद्ध यैसी पाषांड मते राज्यात होऊ देऊ नये

सर्व वाचकानि फोटो मधे दिलेला उतारा वाचावा आणि मग आपली मते नोंदवावी

धर्माच्या आणि राज्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांचे धोरण किती कडक होते हे रामचंद्र पंत आमात्य यानी लिहून ठेवले आहे आवर्जून वाचाण्या जोगे आहे.

image

या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही

मुघल, कुतुबशाही,आदिलशाही यांच्या सोबत संघर्ष करुन शिवाजी राजांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवुन घेतला याचे वर्णन करताना कृष्णाजी अनंत सभासद म्हणतो ” या पृथ्वीवर म्लेंच्छ पातशाह असता,मराठा छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य झाली नाही ”

image

शिवाजी राजे – दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही

आग्रा सुटकेनंतर संभाजी राजांना महाराजांनी पुन्हा मनसबदार म्हणून औरंगाबादला पाठवले. 2 वर्षानी संभाजी राजे पुन्हा आल्यावर शिवाजी महाराज म्हणतात ”  दोन वर्षे लष्कराचे पोट भरले आणि शेहजादा मित्र जोडला हे सामान्य नाही ”

image

शिवाजी राजे – युद्ध केलियाने जय होईल,प्राण गेलियाने कीर्ति होईल

अफजलखान स्वारीच्या वेळी अफजलखान सोबत लढाई करावी की त्याच्यासोबत सला करवा  ही मसलत सुरु असताना महाराज म्हणाले ” युद्ध केलियाने जय होईल,प्राण गेलियाने कीर्ति होईल ”

image

मुरारबाजी देशपांडे – मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ?

पुरंदरच्या लढाई मधे मुरारबाजी देशपांडे निवडक मावळ्यान सोबत दिलेरखानाच्या सैन्यावर तुटून पडले. मुरारबाजी यांचे शौर्य पाहुन दिलेरखान म्हणाला तू माझा कौल घे यावर बाजीनि उत्तर दिले “मी शिवाजी राजांचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय ? ”

image

%d bloggers like this: