अपरिचित इतिहास – भाग एक – १० अपरिचित पैलू – छत्रपती शिवाजी महाराज

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

YouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.
प्रस्तुत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे अज्ञात १० पैलू.

आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली

खरे जंत्री - संपूर्ण शिवकालीन शकावली

खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली

ऐतिहासिक घटनांचे कालमान ठरवण्याकडे सगळ्याच अभ्यासकांचे लक्ष लागलेले असते. अश्या वेळी पूर्वीचे कागद वाचताना त्यातून चंद्र, वार, शुहूर, फसली, हिजरी सन व त्याचे शालिवाहन किंवा राज्याभिषेक शकात रुपांतर तसेच तिथी किंवा इसवी सनातील तारखा यांचा मेळ लावणे हे वेळखाऊ काम आहे. कै. श्री. ग. स. खरे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळात तयार केलेली ही शकावली म्हणजे शिवकाळाची शक-तारीख-वार यांची जंत्री आहे. प्रंचंड कष्ट घेऊन तयार करण्यात आलेली ही शकावली शके १५५१ ते १६४९ (इ.स. १६२९-१७२८) पर्यंतच्या कालगणने करिता अत्यंत उपयोगी आहे. शिवकालीन प्रसंगांचा कालनिर्णय करण्यास हे एक उत्तम साधन आहे. अशीच शकावली पेशवे काळावर बनवणे ही देखील आता काळाची गरज आहे.

सदर शकावली आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

जंत्री मिळवण्याचा दुवा : खरे जंत्री – संपूर्ण शिवकालीन शकावली 

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

मध्ययुगीन इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होते. घोड्यांची निगा राखणे, उत्तम जातिवंत घोडी खरेदी करणे हा रोजच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक होता. खुद्द शिवाजी राजे आपल्या घोड्यांच्या पागेत जाऊन रोज एक श्लोक म्हणत असत असे ९१ कलमी बखरीत नोंद केलेले आहे. –

यस्याश्वा तस्य राज्यं ।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।

एकदा सरसेनापती हंबीरराव यांनी कनकगिरीच्या पाळेगाराकडून  काही शिंगर विकत घेतली होती. वळीवाच्या पावसात ती भिजली. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी मुजुमदार अनाजी मलकरे आणि हंबीरराव यांची चांगलीच फजिती केली होती. मुजुमदारांना १२५ होन जमा करायला सांगितले आणि पुढे याच शिंगरांची काळजी घ्यावी आणि त्यावर पागेचा डाग द्यावा म्हणून त्यांनी हुकूमही केला होता.

पानिपतच्या लढाईपूर्वी तमासा नावाच्या संसर्गजन्य रोगाने १० हजार घोडी मृत्युमुखी पडली होती. आजच्या प्रस्तुत नोंदी ह्या पेशवे काळातील यादी असून त्यातून घोड्यांच्या तसेच इतर जनावरांच्या आजारावर कसा इलाज केला जात असे याचे उल्लेख आहेत. उंट माती खाऊ लागल्यास काय करावे, गाई, घोड्याचे पाय मोडल्यास त्याचा इलाज, म्हशीच्या शिंगांचा औषधी उपयोग अश्या अनेक चमत्कारिक नोंदी तुळशीबागवाले दफ्तरात सापडल्या.

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

राजकीय इतिहासाच्या चर्चेत या व्यावहारिक नोंदी इतिहासात कुठेतरी हरवून जातात. त्याच लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.

%d bloggers like this: