शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

शिवाजी राजांचा सगळ्यात उत्तम गुण कुठला? तर ते लोकनेते होते. प्रत्येक माणसाला त्यांनी आपलेसे करून त्याच्याशी सलोख्याचे संबंध ठेवले. शिवाजी महाराज आणि बारा मावळाचे देशमुख कान्होजी जेधे यांचे संबंध किती दृढ होते हे खालील पत्र वाचल्या नंतर समजून येते. यात शिवाजी महाराज म्हणतात “पहिले पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे” सदर पत्र हे कान्होजी जेधे आजारी आसल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना पाठवले होते.

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

शिवाजी महाराजांचे कान्होजी जेधे यांना घरगुती पत्र

अपरिचित इतिहास – भाग ४ – छत्रपतींचे पेशवे – पूर्वार्ध

नमस्कार,

छत्रपतींच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे पद म्हणजे पेशवा किंवा पंतप्रधान. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू छत्रपतींपर्यंतच्या राज्यकाळात कोण कोण अधिकारी पेशवे म्हणून नियुक्त होते ह्याचा आढावा घेणारा आमचा हा व्हिडीयो. पेशवा म्हणजे काय ? त्या पदावर नियुक्त कोण होते ? त्यांची जबाबदारी काय होती ? ह्याचा आम्ही संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याचा उत्तरार्ध लवकरच प्रकाशित करू. तोवर हा पूर्वार्ध –

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

वीर खुदिराम बोस

खुदीराम बोस

 

भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला. त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला. पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.

मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.

यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली. 1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.

बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.

पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.

किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले. सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.

24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.

यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.

संदर्भ – मृत्युंजयाचा आत्मयज्ञ – वि श्री जोशी

अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र

नमस्कार,

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. गरीब शेतकऱ्यांना, रयतेला सैनिकांकडून जराही त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते हे या पत्रातून दिसते. हे पत्र शके १५९३, वैशाख पौर्णिमा, इंग्रजी तारीख १९ मे १६७३ रोजी लिहिले गेले आहे. महाराजांनी लोककल्याणासाठी हे राज्य स्थापन केले होते, त्यामध्ये लोकांची, रयतेची, आपल्या स्वजनांची किती आस्थेने काळजी महाराज घेत असत हे या पत्रातून दिसते.

 

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

गुलाम कादर जेरबंद

नजीबखान रोहिल्याचा नातू गुलाम कादर हा आपल्या आजोबांप्रमाणेच विकृत मनुष्य होता. त्याने दिल्लीत केलेल्या अमानुष कृत्यांचा पाढा वाचल्यास हा मनुष्य होता कि सैतान असा प्रश्न मनात येतो. बादशाहच्या जनान्याची विटंबना, राजकुमाऱ्यांचे अनन्वित छळ या गुलाम कादर ने केले. या छळाने उच्चांक गाठला जेव्हा गुलाम कादरने बादशाह शाह आलमचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात घातले. महादजी शिंदे यांनी पुढे दिल्लीत येऊन शाह आलमची सुटका केली. एव्हाना गुलाम कादर घौसगडच्या दिशेने पळून गेला होता. मराठ्यांनी त्याचा पिच्छा केला आणि त्याला पकडले. या पकडीचा सविस्तर वाकया मथुरेहुन अप्पाजी राम याने नाना फडणवीस यांना लिहून कळवळा. या वृत्तांतात कादरला कसे पकडले याची सविस्तर नोंद आली आहे. पुढे याच कादरला भयंकर शिक्षा करण्यात आली. त्याने केलेल्या सर्व कृत्यांचे भोग त्याला स्वतः भोगावे लागले. वाचकांच्या अभ्यासाकरिता प्रस्तुत आहे मथुरेहून पाठवलेला हा संपूर्ण वाकया.

गुलाम कादरच्या अटकेचा वाकया

गुलाम कादरच्या अटकेचा वाकया

भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

13892030_10154416353378588_1382593773319092255_n

भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

सेंट्रल जेल,लाहोर
ऑक्टोबर,1930

प्रिय बंधू,

मला शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसा फाशीचा आदेश हि देण्यात आला आहे.या कोठड्यामध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे आणखी खूप आहेत. ते लोक हीच प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी.परंतु त्यांच्यात बहुधा मीच एक मात्र असा माणूस आहे,कि जो मोठ्या उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहतोय – जेव्हा आपल्या आदर्शांसाठी फासावर लटकण्याचे भाग्य मला मिळेल.

फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि आपल्या आदर्शांसाठी क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात ,हे जगाला दाखवून देईन.

मला फाशीची शिक्षा झाली आहे,पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला दाखवून द्यायचे आहे, की क्रांतिकारक आपल्या आदर्शा करिता केवळ मृत्यूला कवटाळतात असेच नव्हे; तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात.मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये.ज्या क्रांतीकारकांना प्रसंग वषात फाशीच्या फंदातुन सुटका मिळाली आहे त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिले पाहिजे,की ते आपल्या आदर्शासाठी केवळ फासावर चढू शकतात असे नव्हे; तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर हीनतम दर्जाच्या अत्याचारांना तोंड देखील देऊ शकतात.

तुझा भगतसिंह

(संदर्भ – शाहिद भगतसिंह समग्र वाड्मय, पृष्ठ – 188)

– विशाल खुळे

बटुकेश्वर दत्त यांचे किशनसिंग यांना पत्र

बटुकेश्वर दत्त यांना  पुढे सालेमच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कधीही फाशी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आपली आणि त्यांची अंतिम भेट होऊ शकणार नाही या विवंचनेत बटुकेश्वर होते. भगतसिंग यांना फाशी होईल या भयाने त्यांनी तत्काळ सरकारकडे भगतसिंग यांची एक भेट व्हावी म्हणून अर्ज केला. परंतु त्यांची ही विनंती फेटाळण्यात आली. अतिशय जड अंतःकरणाने बटुकेश्वर दत्त यांनी किशन सिंग यांना पत्र लिहून भगतसिंग यांच्याबद्दल आपल्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या. ते त्यांच्या पत्रात म्हणतात…..

Batukeshwar to kishansingh copy

“माझ्या आयुष्यात आपल्याला पत्र लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. माझा जिवलग मित्र भाई भगतसिंग याचे दैव अजून ठरायचे आहे. अशा प्रसंगी मी हे पत्र कोणत्या शब्दांनी सुरु करू??? भगतसिंगाचे आणि आपले भावाभावासारखे संबंध आहेत.अशा मैत्रीच्या हृदयातील उसळत्या झऱ्याने भगतसिंगाचे शेवटचे दर्शन मिळावे आणि शेवटची ताटातूट होण्यापूर्वी परस्परास अभिवादन करता यावे, अशी आपण अधिकाऱ्यांना विनंती केली. पण ती अमान्य झाली. तरी तुम्ही माझ्या या भावना भगतसिंगला कळवा.:- बटुकेश्वर दत्त.”

 

बंधुभाव मैत्री काय असते ते या सर्वांकडून शिकावे. भगतसिंग यांची अंतिम भेट होणे आता कठीण आहे हे लक्षात आल्यानंतर होत असलेली तळमळ बटुकेश्वर दत्त यांच्या या पत्रातून जाणवते. देशाला स्वातंत्र्य मिळावे या एकाच उद्देशाने झपाटलेली माणसे एकत्र येतात काय… त्यांच्यात असे बंध निर्माण होतात काय….हे सर्व अनाकलनीय आहे. देशासाठी घरादाराला तिलांजली देऊन या अग्निकुंडात स्वतःला झोकून देणारी ही मंडळी काही वेगळीच. त्यांना कदाचित कल्पना असेलही कि या सर्वाचा शेवट म्हणजे मृत्यू आहे. तरीही न डगमगता प्रसंगी हसत “इन्कलाब झिंदाबाद”च्या घोषणा देत मृत्यूला सामोरे गेलेले हे वीर भारत मातेचे खरे सुपुत्र. या वीरांना प्रणाम….!!

उमेश जोशी.

“वासुदेव बळवंत फडके यांना अटक…….”

दिनांक २० जुलै १८७९

मध्यरात्री वासुदेव बळवंत फडके यांनी घिंबी खुर्द सोडले. देवरनावडगी हे विजापूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तेथे मुक्काम करण्याचा निर्णय फडके यांनी घेतला. तेथे जवळच्याच डोंगरात खोदलेल्या बुद्ध विहारात विश्रांती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत गोपाल मोरेश्वर साठे नावाचे विश्वासू सहकारी होते. त्यांच्यासोबत काही महत्वाची कागदपत्रे, थोडे पैसे, त्यांची आवडती तलवार आणि एक पिस्तुल होते. Major  Daniell त्यांच्या मागावर होता. फडके ३०/३५ मैलाचे अंतर कापून आले होते. खूप दमून गेले होते. त्यांनी दिवसभर काहीही खाल्ले नव्हते.  त्यांचे शरीर ज्वराने फणफणत होते. ओळख पटू नये म्हणून त्यांनी दक्षता घेतली होती. फेटा बांधला होता आणि त्या फेट्याचा लपेटा तोंडावरून घेतला होता. त्यामुळे  पाहणाऱ्याला  त्यांचा संपूर्ण चेहेरा दिसत नव्हता. Major Daniell, अब्दुल सय्यद हक़, Stephenson हे दबक्या पावलांनी विहारापाशी  आले. तिथे अनेक यात्रेकरू झोपले होते. वासुदेव बळवंत फडके यांना गाढ झोप लागली होती. कंदिलाच्या प्रकाशात ओळख पटताच निजलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्यावर झडप घातली आणि कैद करण्यात आले. २४ तासांनंतर फडके यांच्या अटकेची बातमी खरी आहे याची खात्री पटल्यावर मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबईच्या वृत्तपत्रांच्या पुण्याच्या वार्ताहारांनी आपल्या वृत्तपत्रांना भराभर तारा पाठवल्या…

Arrest of Wassudeo Bulwant Phadke

Poona- July 22

11.35 Pm

Our Poona correspondent telegraphs that the “Notorious” Wassudeo Bulwant Phadke was arrested by Major Daniell in the Kalladgi District between Belgaum and Kolhapure.

Wassudeo was in the course of flight and was traced from village and finally caught with one companion in the temple. Wassudeo had enlisted five hundred Arabs And Rohillas and advanced there jamadar Rs. 2000 promising  Rs. 3000 more to purchase horses. Paper found with him contain a proposed plan of operation and rules for his conduct and deportment while fighting. The news of his capture has created great excitement in Poona.

 

Vasudev B Phadke

वासुदेव बळवंत फडके यांना जागेपणी पकडणे अशक्य आहे याची जाणीव Major Daniell याला असावीच. त्यामुळे तोही बराच वेळ त्यांच्या मागावर असून त्यांना पकडण्याचे धारिष्ट्य दाखवू शकला नव्हता. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर तो लक्ष ठेउनच होता. त्यांच्या मागावर होता. ते याच गावात विश्रांतीसाठी थांबतील हा त्याचा अंदाज खरा ठरला. शिवाय त्यांच्याबद्दल कोण्या फितुराने देखील माहिती दिली असल्याचे दिसते. नावं उपलब्ध नाहीत. कंदिलाच्या प्रकाशात ओळख पटवून घेतली तेव्हा वासुदेव बळवंत फडके दमून शांत झोपी गेले होते. समोर असलेल्या वासुदेव बळवंत फडके यांच्या दोनी बाजूला पाय ठेऊन. त्याच्यावर पिस्तुल रोखून, एक पाय त्यांच्या तलवारीवर ठेऊन दुसऱ्या हाताने गळा दाबून मोठ्या शौर्याने (?) पराक्रम गाजवून (?) major Daniell  याने ज्वराने थकून झोपलेल्या फडक्यांवर झडप घालून कैद केले. त्याची बातमी मुंबईच्या वृत्तपत्रांनी विजयी सुरात छापली.

इंग्रजांच्या नाकी नऊ आणून सळो कि पळो करणारे आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना मानाचा मुजरा.

(संदर्भ: वासुदेव बळवंत फडके चरित्र. पृष्ठ  २६०,२६१,२६३,२७१)

उमेश जोशी.

आम्ही कशासाठी लढत आहोत?

बॉम्ब खटल्यातील दिल्ली सेशन कोर्टात दिलेली ऐतिहासिक जबानी.

(असेम्ब्लीत बॉम्ब फेकल्यानंतर ६ जून १९२९ रोजी दिल्लीचे सेशन जज्ज न्या. लिओनिआ मिडलटन यांच्या कोर्टात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केलेले ऐतिहासिक निवेदन.)

 

अर्थात हे निवेदन संपूर्ण नाही. या निवेदनातील काही भाग आपल्या सदस्यांसाठी देत आहे. या निवेदनात सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला आहे. सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांच्या निवेदनातील काही भाग खालील प्रमाणे.

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त

“ अथांग सागर रुपी भारतीय मानवतेची ही वर वर दिसणारी शांतता म्हजे कोणत्याही क्षणी उद्भवू शकणाऱ्या एका भीषण तुफानाचे चिन्ह आहे. येणाऱ्या संकटाची परवा न करता बेफाम वेगाने पुढे जाणाऱ्या लोकांसाठी आम्ही फक्त डोक्याची घंटा वाजवली आहे, ‘स्वप्नाळू अहिंसेचे’ युग आता संपले आहे आणि आज उदयाला येणाऱ्या नव्या पिढीला त्या ‘स्वप्नाळू अहिंसेच्या’ व्यर्थतेबद्दल कोणताही संदेह उरलेला नाही, एव्हढेच फक्त आम्ही जनतेला सांगू इच्छितो.

वर आम्ही स्वप्नाळू अहिंसा असं शब्द प्रयोग केला आहे त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे. आक्रमण करण्याच्या हेतूने ज्या वेळी बळाचा वापर केला जातो. तेव्हा त्याला हिंसा म्हणतात आणि नैतिक दृष्टीकोनातून त्याचे समर्थन करता येत नाही. परंतु जेव्हा एका उचित आदर्शासाठी त्याचा वापर केला जातो, तेव्हा नैतिक दृष्ट्याही ते उचित असते. कोणत्याही परिस्थितीत बलाचा वापर केला जाऊ नये, हा विचार स्वप्नाळू आणि अव्यवहारी आहे. गुरु गोविंदसिंग, छत्रपती शिवाजी, केमाल पाशा, रीजाखान, वॉशिंगटन, लाफायेत, गेरीबल्डी आणि लेनिन यांच्या आदर्शापासून स्फूर्ती घेऊन आणि त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेऊनच भारतात उसळणारे हे नवे आंदोलन निर्माण होत आहे………..”

-सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त.

 

त्यांनी त्या वेळी प्रचलित अहिंसेला “स्वप्नाळू अहिंसा” असे संबोधले आहे. आणि त्यांनी तसे का संबोधले आहे त्याचे देखील उत्तर त्याच निवेदनात दिले आहे. हे संपूर्ण निवेदन वाचण्यासारखे आहे. सरदार भगतसिंग यांचा जन्म १९०७ सालचा बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १९१० सालचा म्हणजे हे निवेदन यांनी दिले तेव्हा यांची वये अनुक्रमे २२ आणि १९ होती. या वयात त्यांच्या मनात काय विचार सुरु होते याचा आरसा म्हणजे हे निवेदन होय. अशी अनेक निवेदने, त्यांच्या जबान्या, त्यांची पत्रे उपलब्ध आहेत. ती वाचताना हेच जाणवते, इतक्या तरुण वयात यांना देश आणि स्वातंत्र्यासमोर काहीही महत्वाचे वाटत नव्हते. या आणि अशा अनेक क्रांतिवीरांनी देशासाठी प्राण वेचले. त्या नाम अनाम वीरांना मानाचा मुजरा….

(संदर्भ: शहीद भगतसिंग : समग्र वाड्मय, पृष्ठ  १३२ ते १३८)

:उमेश जोशी.

समस्या समाधान – १ – शंभूराजे आणि तारापूर

वाचकहो नमस्कार,
ब्लॉगवर नियमितपणे आपण अनेक प्रश्न विचारात असता. त्या प्रश्नांना आम्ही जमेल तशी यथाशक्ती उत्तरे देतो. प्रश्नांचा ओघ वाढल्याने त्यासाठी स्वतंत्र सदर सुरु करत आहे ज्याने सर्व प्रश्न एका जागी एकसंध राहतील.

आपल्यालाही मराठ्यांच्या इतिहासासंबंधी काही प्रश्न आहेत का ? असल्यास या सदरात आपण ते विचारू शकाल.

– धन्यवाद –


श्री रवी जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाने सदर सुरु करतो.

श्री रवी जाधव यांचा प्रश्न –

संभाजी महाराज कधी तारापुर भागात आले होते का? मी तारापुर जवळच राहतो…किल्ल्या पासून दहा पावलांन वर आमची शाळा आहे.. रा. ही. सावे विद्यालय..
Itke vrsha tithe shikun amhi bhautek vela killya chya magchya bajune jaycho baghayla kai ahe te.. kadhi madhe jata nahi al amhala…te kahitari karara ne dilele ahe mhantat to killa purvi pasun ajun hi to killa jyana dila hota tyanchya dekh rekhi khali ahe..private property ch jhali as mhanav lagel karan to nehami bandach asto..mala nit mahiti nahi…pan lahana cha motha jhalo pan kadhi madhe kai ahe te baghta nahi ala mhanun… Mala asa prashna padlay ki sambhaji maharaj kadhi hya bhagat ale hote ka? Kelve-mahim,tarapur,daman, vasai hya Portuguesanchya bhagat? Chimaji appa ale hote pan sambhaji maharaj???

Mobile varun marathi type karayla khup vel lagat hota mhanun English madhech type karun bolo sorry…mi hach prashna Facebook var pan takla hota pan kahi uttar nahi milal mhanun ithe punha..

शंभूराजे आणि तारापूर

आपण उल्लेख केलेला परिसर उत्तर फिरंगाण आहे.

या भागात खुद्द संभाजी राजे आले होते का?

याचे उत्तर आहे होय ! – १५-४-१६८३ रोजी संभाजी महाराजांनी स्वतः १००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन तारापूरवर हल्ला केला आणि किल्ल्याबाहेरील शहर जाळले. मराठ्यांच्या इतर तुकड्यांनी दमण पासून वसई पर्यंत काही छोट्या बंदरावर हल्ले केले. २ पोर्तुगीज पाद्री देखील कैद केले होते. तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी मॅन्युअल अल्वारेस याने मराठ्यांना प्रतिकार केला आणि गोव्यालाही वृत्त पाठवले. गोवेकरांनी मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव याला अटक केली. पुढे मराठ्यांनी पोर्तुगीझांना येणारे धान्य अडवले आणि रसद मारली ज्यामुळे त्यांनी माघार घेऊन येसाजीला सोडून दिले. पुढे हे संबंध वाईट होत गेले आणि १६८४ दरम्यान संभाजी राजांची मोहीम दक्षिण फिरंगाणात झाली.  ज्याला आज आपण गोवा मोहीम किंवा व्हडलें राजीक म्हणतो. संभाजी महाराजांच्या फक्त हालचाली वाचायच्या असल्यास श्री. शिवदे यांचे ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा या पुस्तकातील जोड प्रकरणातील कालपट हा धडा वाचावा. परंतु या मोहिमेत तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आला नाही असे दिसते कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे मुअज्जमच कोकणात उतरला. १६७० ते १७२८ पर्यंत तारापूर किल्ला आणि प्रदेश पोर्तुगेज अंमलाखाली होता हे निश्चित नोंदींवरून समजते. चिमाजी अप्पांनी हा प्रदेश पुढे स्वतंत्र केला. भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

%d bloggers like this: