अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र
ऑगस्ट 11, 2016 4 प्रतिक्रिया
नमस्कार,
छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. गरीब शेतकऱ्यांना, रयतेला सैनिकांकडून जराही त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते हे या पत्रातून दिसते. हे पत्र शके १५९३, वैशाख पौर्णिमा, इंग्रजी तारीख १९ मे १६७३ रोजी लिहिले गेले आहे. महाराजांनी लोककल्याणासाठी हे राज्य स्थापन केले होते, त्यामध्ये लोकांची, रयतेची, आपल्या स्वजनांची किती आस्थेने काळजी महाराज घेत असत हे या पत्रातून दिसते.
आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !
आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!
धन्यवाद.
असाच मजकूर असलेले “शिवाजी महाराजांचे किल्लेदारास पत्र ” असे काही नावाचे पत्र लहानपणी (४०/४५ वर्षांपूर्वी) वाचले होते. उपलब्ध असल्यास त्या बद्दल अधिक माहिती कोठे मिळेल? आजच्या वातावरणात त्याची आठवण येते.
LikeLike
शिवाजी महाराजांची किल्लेदारांना लिहिलेली अनेक पत्रे उपलब्ध आहेत. आपण नेमके कुठले पत्र म्हणत आहात ते समजू शकत नाही. पत्राचा तर्जुमा आठवत असल्यास जरूर कळवा, आम्ही ते पत्र उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
LikeLike
सभोवतालची सार्वत्रिक दैना पाहून मला त्या पत्राची आठवण झाली.
मला त्यातल्या तीन गोष्टी आठवतात.
१. किल्लेदाराने कुटुंबातील नात्यातील माणसांना किल्ल्यावर जबाबदारीच्या कामासाठी नेमू नये.
२. किल्ल्यासाठी लागणारी बांधकामाची लाकडे शेतकऱ्यांकडून सौदा करून विकत घ्यावीत.
३. किल्ल्यांची देखरेख आणि रसद यातील तत्परता महत्वाची.
या तीन गोष्टी कुठल्याही खाजगी किंवा सरकारी संस्थेसाठी महत्वाच्या. कोणत्याही काळात, कुठेही.
हे आजच्या प्रशासनाचे अधिकृत धोरण असायला हवे.सगळ्यांना हे महत्वाचे वाटावे.
शिवाजीमहाराजांकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.
LikeLike
धन्यवाद. आपण उल्लेख करत असलेल्या गोष्टी आज्ञापत्रात आहेत. आपण आज्ञापत्रातील दुर्गवर्ग वाचला असावा.
LikeLike