थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक

आपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.

इतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

खटासी पाहिजे खट

गोवेकर फिरंगी अत्यंत कडवे धर्मप्रसारक होते.
शिवाजी महाराजांनी गोवेकर फिरंग्यांना चांगलाच धडा शिकवला होता.
महाराजांनी काय केले ह्याचे वर्णन असणारी एक डाक इंग्रजांना आली जी त्यांनी त्यांच्या रेकॉर्ड मध्ये नमूद करून ठेवली.
तीच इथे प्रस्तुत करत आहोत. हे वाचून एक पक्के समजते की ज्याला ज्या भाषेत समजते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे लागते.


मूळ नोंद –

गोव्याच्या व्हाइसरॉयने रोमन कॅथलिक धर्म वगळून इतर धर्माच्या माणसांना हाद्दपारीचा हुकूम काढल्यामुळे क्रुद्ध होऊन शिवाजीने गोव्यानजीक बारदेशच्या हद्दीवर स्वारी केली.
तेथील चार पाद्री लोकांनी स्वधर्मीयांव्यतिरिक्त इतरांचा प्राणनाश करण्याचा सल्ला दिला होता.
हे लक्षात ठेवून त्यांनी स्वतः शिवाजीचा हिंदू धर्म नाकारल्यामुळे शिवाजीने त्यांचा शिरच्छेद केला, त्यामुळे घाबरून जाऊन व्हाइसरॉय ने आपला क्रूर व कडक हुकूम परत घेतला.
शिवाजी ने आसपासच्या सर्व मुलखात जाळपोळ करून १५० लक्ष होनांची लूट केली.

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

गोव्यासंबंधी इंग्रजांना आलेली डाक

संदर्भ – शि.प.सा.सं

http://www.marathahistory.com
http://www.youtube.com/marathahistory

 

महाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज

शिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.
मुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.
सदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.
कामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.

sarjerao-2

‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण

%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0

विद्याचरण पुरंदरे यांनी अनुवाद केलेले ‘समरधुरंधर‘ हे राफ्टर पब्लिकेशन्सचे १४ वे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व अभ्यासकांच्या चरणी अर्पण. २९ जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे ‘पत्रकार भवन’ येथे प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी डॉ सचिन जोशी, डॉ सदाशिव शिवदे, श्रीमती वासंती निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच मुल इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ केदार फाळके हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी उपस्थित रसिकांना मार्गदर्शन केले तसेच ‘राफ्टर पब्लिकेशन्स’ च्या या पुस्तकाचे भरपूर कौतुकही केले. पुस्तक प्रमुख पुस्तक विक्रेते तथा online उपलब्ध आहे.

पुस्तक online खरेदी करण्याकरिता खालील link वर click करा

Amazon – http://amzn.to/2jwHqCb

Sahyadri Books – http://bit.ly/2kX1l9T

Book Ganga – http://www.bookganga.com/R/7H14C

 

फिरंगी याजवर शह देऊन त्याचा प्रांत मारीत चाललो

महाराजांनी स्वतःचे कर्तृत्व स्वतः लिहावे अशी पत्रे फार थोडी आहेत. त्यातले हे एक पत्र.
शिवाजी महाराजांनी बाजी घोरपडे, सावंत, यांचे पारिपत्य कसे केले याची माहिती सदर पत्रावरून आपल्याला समजायला मदत होते.
याच पत्रात शिवाजी महाराजांनी आपण पोर्तुगीजांवर कसे वर्चस्व निर्माण केले हे देखील कथन करतात.
शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तुत पत्राचा चांगला उपयोग होऊ शकतो.

प्रस्तुत पत्रातील उल्लेखात फिरंगी म्हणजे पोर्तुगीज आणि टोपीकर म्हणजे इंग्रज.

sawant-ghorpade

%d bloggers like this: