‘समरधुरंधर’ वाचकांच्या चरणी अर्पण

%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0

विद्याचरण पुरंदरे यांनी अनुवाद केलेले ‘समरधुरंधर‘ हे राफ्टर पब्लिकेशन्सचे १४ वे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व अभ्यासकांच्या चरणी अर्पण. २९ जानेवारी २०१७ रोजी पुणे येथे ‘पत्रकार भवन’ येथे प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रसंगी डॉ सचिन जोशी, डॉ सदाशिव शिवदे, श्रीमती वासंती निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच मुल इंग्रजी पुस्तकाचे लेखक डॉ केदार फाळके हे देखील उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी उपस्थित रसिकांना मार्गदर्शन केले तसेच ‘राफ्टर पब्लिकेशन्स’ च्या या पुस्तकाचे भरपूर कौतुकही केले. पुस्तक प्रमुख पुस्तक विक्रेते तथा online उपलब्ध आहे.

पुस्तक online खरेदी करण्याकरिता खालील link वर click करा

Amazon – http://amzn.to/2jwHqCb

Sahyadri Books – http://bit.ly/2kX1l9T

Book Ganga – http://www.bookganga.com/R/7H14C

 

आमची नवीन पुस्तके – इतिहासाच्या पाऊलखुणा : भाग २ – शौर्य – पुरंदरे – रणझुंजार

मान्यवर रसिकहो !

सप्रेम नमस्कार.

आपल्याला कळवताना आनंद होत आहे की १० डिसेंबर १०२६ रोजी विलेपार्ले, मुंबई येथे राफ्टर पब्लिकेशनच्या विद्यमाने इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला.

त्यासोबत शौर्य, रणझुंजार, पुरंदरे या पुस्तकांचेही प्रकाशन झाले.

सादर आहे प्रकाशन सोहळ्यातील काही क्षणचित्रे –

इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २

इतिहास म्हटलं की मराठी माणसाला चटकन काय आठवतं ? अर्थातच मराठ्यांचा मध्ययुगीन इतिहास. पण गेली काही वर्ष या इतिहासाची निर्भत्सना होऊन मूळ इतिहास मागे पडत चालला होता. आणि म्हणूनच, आपल्या या दैदिप्यमान इतिहासाची आठवण रहावी याकरिता खारीचा वाटा उचलत काही अभ्यासकांच्या लेखण्या सरसावल्या, अन त्यातूनच जन्माला आला ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ हा एक साधार लेखसंग्रह ! पाऊलखुणाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आपल्यासमोर नविन माहिती आणि काही अपरिचित गोष्टींचा इतिहास समकालीन संदर्भांच्या आधारे या पाऊलखुणाच्या दुसर्‍या भागात मांडत आहोत. शाहजीराजांपासून मराठेशाहीच्या उत्तरार्धात घडलेल्या ऐतिहासिक घटनांचा साधार मागोवा म्हणजेच ‘इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २’

या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – इतिहासाच्या पाऊलखुणा – भाग २

शौर्य

आपली पुढची पिढी कशी असावी असं वाटतं आपल्याला ? शूर, पराक्रमी, देशावर मनापासून प्रेम करणारी, आव्हानांना भिडणारी, Risk स्विकारणारी, उत्तम नेतृत्वगुण असणारी, चारित्र्यवान, ‘असाध्य, अशक्य, अप्राप्य’ गोष्टी सहज साध्य करून दाखवणारी ! प्रसंगी स्वतःच्या Safety, Dignity, Honour या पलिकडे जाऊन देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदानास तयार असणारी, अन म्हणूनच सार्‍या देशवासियांच्या आदर आणि प्रेमास पात्र.. हो ना ? अशाच सर्व गुणांनी संपन्न असलेल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजे “शौर्य” ! हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे लिखित या पुस्तकात आपल्याला अभिमान वाटेल अशा भारतीय सैन्याचा पराक्रम आपल्याला वाचायला मिळेल.

या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – शौर्य

पुरंदरे

सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्‍यांच्याच वाड्यात. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना दिला पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्‍यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी. कौस्तुभ कस्तुरे लिखित “पुरंदरे – अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे”. ह्या पुस्तकात अठराव्या शतकात पुरंदरे घराण्याला छत्रपती शाहू महाराजांपासून ते सवाई माधवराव पेशव्यांकडून आलेली अस्सल मोडी इनामपत्रे तसेच त्र्यंबक सदाशिव तथा नाना पुरंदर्‍यांना आलेली काही महत्वाची पत्रे प्रकाशित करण्यात येत आहेत. सदर मूळ मोडी कागदपत्रांची छायाचित्रेही पुस्तकात समाविष्ट करण्यात आली असून ही सर्व कागदपत्रे आजवर अप्रकाशित होती, ती प्रथमच प्रसिद्ध :होत आहेत.

या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – पुरंदरे

रणझुंजार

छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द अवघ्या नऊ वर्षांची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळ्याकुट्ट औरंगरुपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलामी झंजावाताला थोपवून धरणारी. नाऊ वर्षे वेगवेगळ्या आघाड्यांवर शत्रूशी कडवी झुंज देणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची यशोगाथा म्हणजेच “रणझुंजार”. मरणाला मिठीत घेऊन हौतात्म्य पत्करणार्‍या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धभूमीवरील कर्तृत्वाची गाथा सप्रमाण सिद्ध करणारा डॉ. सदाशिव शिवदे लिखित हा ग्रंथ वाचकांना, अभ्यसकांना निश्चितपणे स्तिमित करेल.

या लिंकवर क्लिक करून आपण हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करू शकाल – रणझुंजार

हे सर्व शक्य झाले ते केवळ आपले प्रेम आणि पाठबळाच्या जोरावर !

अधिक काय लिहावे ?

आमुचे अगत्य असो द्यावे !

आपले
प्रणव – विशाल – उमेश

इतिहासाच्या पाऊलखुणा – पेशवाई – झंझावात

पुस्तक प्रकाशन सोहळा

पुस्तक प्रकाशन सोहळा

नमस्कार वाचकहो !

आपले प्रेम आणि स्नेहाच्या बळावर आम्ही आमचे पुढचे पाऊल दिमाखात टाकले. दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी राफ्टर पब्लिकेशन्सच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आणि पेशवाई या दोनीही पुस्तकांचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे आणि ज्येष्ठ खगोल तज्ञ श्री. मोहनराव आपटे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. राफ्टर पब्लिकेशन्स आणि जनसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. पार्ले टिळक विद्यालय असोसिअशन च्या महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. रसिक जाणकार वाचक श्रोत्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाऊन नवीन पुस्तकांचे स्वागत केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे व लेखकांचे गुरु डॉ.सदाशिव शिवदे यांनी तसेच जेष्ठ अभ्यासक श्री.मोहन आपटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकाशक श्री. उमेश जोशी यांनी ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यामागची आपली भूमिका मांडली. तसेच पेशवाई चे लेखक श्री. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी पेशवे काळातील मोडी पत्रे या विषयावर Presentation दिले. या सर्व प्रकाशन सोहळ्यास उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.अनघा मोडक यांनी उत्तमरित्या केले.

इतिहासाच्या पाऊलखुणा अनावरण

इतिहासाच्या पाऊलखुणा अनावरण

पेशवाई अनावरण

पेशवाई अनावरण

डॉ. शिवदे - आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप

डॉ. शिवदे – आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ श्री. आपटे सर - चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक

ज्येष्ठ खगोल तज्ञ  श्री. आपटे सर – चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक

????????????????????????????????????

उपस्थित रसिक वाचकांशी संवाद साधताना राफ्टर पब्लिकेशन्स चे श्री. उमेश जोशी.

उद्घाटनाच्या दिवशी तिथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रती हातोहात संपल्या हे आपले प्रेम आणि आपुलकी मुळेच शक्य झाले.ब्लॉगच्या निमित्ताने एरवी प्रतिक्रियातून भेटणाऱ्या तुम्हा वाचकांपैकी काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्या. आपल्याला भेटून आम्हाला आनंद झाला.

आमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत

आमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत

श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद

श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद

रत्नागिरीतील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्रभूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांची भेट घेताच त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळाले हे अहोभाग्य! आदरणीय बाबासाहेबांनी मलिक अंबरच्या योगदानाची इतिहासाने दाखल घेतली गेली नसल्याचे आणि त्यामुळे आमचा पाहिलाच लेख खूप आवडल्याचे मनमोकळेपणे सांगितले. आम्ही आमचा अभ्यास पुढे असाच सुरु ठेवावा आणि इतिहासातील लपलेले अनेक दुवे लोकांसमोर आणावे म्हणून शुभेच्छा दिल्या.

साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढे १५ ते १८ जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपण सर्व इतिहासप्रेमी रसिक वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व दोन्हीही पुस्तकांची प्रकाशकाकडील पहिली आवृत्ती हातोहात संपली.

आपले प्रेम आणि सहयोग असाच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या दुसऱ्या खंडाचे कामही लेखकांनी सुरु केले आहे. दोन्हीही पुस्तकांची सुधारित द्वितीय आवृत्तीचे कामही सुरु आहे.

तर सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्‍स्‌ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..

“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) –

इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहासाच्या पाऊलखुणा

आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी विशाल खुळे, प्रणव महाजन, उमेश जोशी, योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार आणि कौस्तुभ कस्तुरे या तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या. अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स तर्फे आपल्याला सादर. या लेखसंग्रहात गनिमी काव्याचा प्रणेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिक अंबर या सिद्दी निजामशाही सरदाराच्या व्यक्तीचित्रापासून ते मराठेशाहीचा कळस म्हणजेच अटकेवर फडकलेला जरीपटका या मोठ्या कालखंडावर लेख आहेत.

“पेशवाई” – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान –

पेशवाई

पेशवाई

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स आपल्यासमोर घेऊन आले आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत.

झंझावात

झंझावात

“झंझावात” – मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा –

|| चतुर्थ अवृत्ती लोकार्पण ||

जुलै २०१३ साली प्रकाशीत झालेले झंजावात हे गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले ऐतिहासिक पुस्तक. अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला महाराष्ट्राबाहेरील मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या, गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची सखोल माहिती मिळते.

इतिहासाच्या पाऊलखुणा, पेशवाई या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीतील आणि गुरुवर्य निनादराव बेडेकर लिखित झंझावात या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीतील अगदी काही मोजक्या प्रती सध्या amazon.in वर शिल्लक आहेत ज्या आपण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर Click करून मागवू शकाल.

बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !

– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा ! … लवकरच आपल्या भेटीला.

नमस्कार वाचकहो !

ब्लॉगवरील लिखाणाचे हक्क राफ्टर पब्लिकेशनने घेतल्याचे आम्ही मागे कळवले होतेच. आपले प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आमची पुढची पायरी …

Event Details Ad

सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्‍स्‌ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..

“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) :

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा !

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा !

“इतिहास” !! आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या तर राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी काही तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या.अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.

“पेशवाई” :

पेशवाई - महाराष्ट्राच्या इतिहासातले एक सुवर्णपान !

पेशवाई – महाराष्ट्राच्या इतिहासातले एक सुवर्णपान !

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स लवकरच आपल्यासमोर घेऊन येत आहे.. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत. हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला ग्रंथ राफ्टर पब्लिकेशन्‍स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.

तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी !

Bookstore Details - Ad

बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !

– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –

%d bloggers like this: