१६८१ साली मराठ्यांनी बुऱ्हाणपुरावर चाल करून मुघलांना चांगलाच हात दाखवला होता. मुघलांची शान असलेले बुऱ्हाणपुरसारखे शहर लुटून मराठ्यांनी त्यांना जणू आव्हान दिले होते.
शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली. राजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.
Jijamata’s letter to officers in YerwadaSeal of JijamataLetter to Vithoji HaibatravLetter of Shivaji Maharaj Overturning a decision which was based on Jijamata’s letterJijamata warning Mukund Deshkulkarni referring to Chiranjeev – Possibly Shivaji Maharaj
मध्ययुगीन काळात इतर देशी सत्तांपेक्षा मराठे एवढे भव्य साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले कारण म्हणजे त्यांच्यात असलेले सैनिकी कौशल्य आणि त्यांना वेळोवेळी मिळालेले खंबीर असे लष्करी नेतृत्व.
१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.
लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.
शिवकाळात महाराष्ट्रातील गावागावात असणाऱ्या गोतसभा नामक न्यायव्यवस्थेमार्फत न्यायनिवाडा होत असे आणि या न्यायनिवाड्यामध्ये न्याय देण्यासाठी वापरली जाणारी ‘दिव्य’ ही एक वेगळी पद्धत होती. या दिव्य पद्धतीचा मागोवा घेण्याचा आमचा हा प्रयत्न.
क्या कोई शातिर राज्यकर्ता? कोई सफल शासक? या एक धर्मांध जुल्मी क्रूरकर्मा बादशाह? जिसने अपने ज़िदके कारण पुरे मुगलिया सल्तनत को दावपे लगाया और उसके पतन के लिए कारण बना | ये है बादशाह औरंगज़ेब की कहानी!
मराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती? हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.
व्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –
1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र
2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्यांना लिहिलेले पत्र
3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी
4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था
5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी
6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे
7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे
८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले
९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण
१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे
११. सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे.