राजमाता जिजाऊ – स्वराज्याचे शिलेदार

शहाजीराजांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात जिजाबाईंनीही अतिशय मोलाची साथ दिली होती. आपल्या अनुभवसिद्ध पत्नीच्या हाती आपल्या तेजस्वी पुत्राला सोपवून शहाजीराजांनी आपल्या स्वतंत्रराज्याची कल्पना आपल्या पुत्रा करवी साकार करून घेतली.
राजमाता जिजाऊ ह्यांचा कारभार, त्यांची पत्रे हयातून होणारे व्यक्तिमत्त्वाचे दर्शन ह्यावर आपला आजचा व्हिडिओ. नक्की पहा.

Jijamata’s letter to officers in Yerwada
Seal of Jijamata

Letter to Vithoji Haibatrav

Letter of Shivaji Maharaj Overturning a decision which was based on Jijamata’s letter

Jijamata warning Mukund Deshkulkarni referring to Chiranjeev – Possibly Shivaji Maharaj

स्वराज्याचे घोडदळ – अपरिचित इतिहास – भाग ३७

ज्याचे अश्वदळ त्याची पृथ्वी प्रजा. अपरिचित इतिहास ह्या आपल्या मालिकेत आज पाहूया तंजावर ते पेशावर आपल्या टापांखाली व्यापणारे स्वराज्याचे घोडदळ.

मंथन – रायगडाचे मुघल किल्लेदार

१६८९ साली मुघलांनी रायगड घेतला. त्या नंतर रायगडावर किल्लेदार कोण होते? औरंगजेबाने २००० सैनिक रायगडावर पाठवले त्यातले किती नेमके पोचले? जाणून घेऊया मंथनच्या आजच्या भागात.

रायगडाचे मुघल किल्लेदार

जवहार गज – #MHSHORTS

जवहार गज हा शिंद्यांचा हत्ती विशेष होता तो आणि त्याचा शूर माहूत बडे खान ह्याची गोष्ट !

लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का? – अपरिचित इतिहास – भाग ३४

लाल महाल आणि शनिवार वाडा या दोन्ही वास्तू मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. आज अपरिचित इतिहास या मालिकेत जाणून घेऊया शनिवार वाडा आणि लाल महाल या विषयीच्या उपलब्ध नोंदी.

लालमहाल पाडून शनिवारवाडा बांधला होता का?

अधिक माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ – https://amzn.to/2QgF2xA मध्ये उपलब्ध.

मंथन : अयोध्येच्या निमित्ताने – मराठे आणि धर्मस्थळ

मराठ्यांची हिंदुस्थानातील प्रमुख धर्मास्थळांच्या विषयी काय भूमिका होती? हा प्रश्न सध्या अनेकांनी सध्या विचारला. समकालीन कागदपत्रातून आपल्याला काय दिसते हे जाणून घेऊया.

व्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेली पत्रे –

1. शिवाजी महाराज – आज्ञापत्र 

2. संभाजी महाराज – रजपूत रामसिंग ह्यांना लिहिलेले पत्र 

3. पेशवे बाजीराव – बादशहला मागणी 

4. पेशवे बाजीराव – मथुरा व्यवस्था 

5. नानासाहेब पेशवे – गया व कुरुक्षेत्र कर माफी 

6. नानासाहेब पेशवे – काशी, अयोध्या, प्रयाग घ्यावे 

7. माधवराव पेशवे – मृत्यूपत्रातील कलमे 

८. नाना फडणवीस ह्यांना आलेले पत्र – मथुरा वृंदावन सरकारात आले 

९. देवी अहिल्याबाई होळकर – देवालये, घाट नुतनीकरण 

१०. नाना फडणवीस ह्यांचा महादजी तगादा – विश्वेश्वर देवालय मुक्त करावे 

११.  सेतुपती ह्यांचे बाजीराव रघुनाथ ह्यांना पत्र – उत्तर दक्षिण पुण्यक्षेत्रे गेली ती घेणे. 

रायगड आणि औरंगजेबाचा शिलालेख

नमस्कार,
Vertical Videos ह्या प्रकारात पदार्पण करण्याच्या आपण ह्या नवीन सिरीज द्वारे प्रयत्न करत आहोत.
थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याचा आपला हा प्रयत्न – #MHSHORTS
२ मिनिटात जाणून घेऊया रायगड वरील औरंगजेबाच्या शिलालेखाविषयी जो कधी बसवलाच गेला नाही!

ब्लॉग फॉलो करणार्‍या आमच्या सर्व मित्रांसाठी सोबत हा लेख देखील देत आहोत. High Resolution PDF Available Here.

औरंगजेबाचा शिलालेख

औरंगजेबाचा शिलालेख

धन्यवाद !

 

मस्तानी – अपरिचित इतिहास – भाग ३२

मस्तानी – थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्यासोबत एकाच श्वासात नेहमी घेतले जाणारे नाव. अखेर कोण होत्या मस्तानी बाईसाहेब? केवळ एक कंचनी? की सिनेमात दाखवल्या प्रमाणे युद्धभूमीवर लढलेल्या सेनानी? समकालीन पुरावे ह्याबद्दल शतकांपासून मौन बाळगून आहेत. आज अपरिचित इतिहास ह्या मालिकेत आपण बांदा संस्थानाची स्थापना ज्यांच्या शाखेपासून झाली त्या मस्तानीबाई ह्यांचा मागोवा घेणार आहोत.

अपरिचित इतिहास – भाग ३१ – शनिवारवाड्यातील वास्तु

शनिवार वाडा म्हणजे पुण्याचा मानबिंदू. पुण्याचे एके काळचे वैभव. शनिवारवाड्याने अनेक ऊन पावसाळे पाहिले. अनेक स्थित्यंतरे आणि चढ उतार अनुभवले. ह्या विडियो मध्ये आपण शनिवार वड्यातील अवशेष ह्यांचा जुन्या नोंदी द्वारे अभ्यास करण्याच्या आणि जुन्या संशोधकांनी केलेली स्थल निश्चिती दाखवण्याचा प्रायत्न करणार आहोत. थोरले बाजीराव पेशवे, राघोबा दादा, सदाशिवराव भाऊ, थोरले माधवराव हे वाड्यात नेमके कुठे राहायचे? दप्तरखाने, दिवाणखाने आणि रंगमहाल नेमके कुठे होते? हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

अपरिचित इतिहास – भाग ३० – छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात?

छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात?

इतिहासाचा अभ्यास हा पत्रांवरून करावा. ही समकालीन पत्रे म्हणजे इतिहासाचा आरसा. पत्रावरून अभ्यास करताना बरीचशी अपरिचित माहिती समोर येते.

रोहीड खोऱ्याचे सर्जेराव जेधे यांना लिहिलेल्या या पत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा किंवा जाणता राजा हे रूप प्रकर्षाने जाणवते. शत्रू मुळे आपली रयत धोक्यात आहे हे ओळखून महाराजांनी लिहिलेले हे पत्र आहे.

चला तर पाहू हे खूप महत्वाचं असं पत्र.

 

%d bloggers like this: