शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

शिवाजी महाराज- हिंदू आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

शिवाजी महाराज – हिंदुंचा आणि तुरकांचा मिलाप कधी झाला आहे काय ?

वरील वाक्य हे शिवाजी महाराज आणि बुंदेल खंडाचा राजा छत्रसाल बुंदेला यांच्या भेटिच्या दरम्यानचे आहे.

छत्रसाल बुंदेला हा ज्यावेळी शिवाजी राजांना भेटण्यास आला त्यावेळी त्यांच्यात जे संभाषण झाले ते छत्रसाला कड़े आश्रित असणारा ‘लालकवी ‘ याचे मूळ नाव गोरेलाल याने टीपुन ठेवले होते. छत्रसाल याच्या आज्ञेवरुन लालकवी ने छत्रप्रकाश नावाचा ग्रंथ लिहला यात हे संभाषण आले आहे.

हे सांगण्याचा मूळ मुद्दा असा वरील वाक्य नीट वाचले की समजून येते,शिवाजी महाराजांची स्वराज्या प्रति धारणा नक्की काय होती शिवाय याच आशयाचे एक पत्र त्यांनी व्यंकोजी राजांना पण पाठवलेले उपलब्ध आहे. नाहीतर आजकाल नको नको ती लेबल शिवाजी राजांना लावन्याचे कार्यक्रम सरास सुरु आहेतच.

water marks

 

%d bloggers like this: