शिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र

मध्ययुगीन इतिहासात आपण अनेकदा पाहतो ते सरदारांचे एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जाणे. बहुतांश वेळा या सत्ता एकमेकांच्या विरोधात असत पण आज प्रस्तुत करत असलेले हे पत्र त्या अर्थाने वेगळे आहे. शिवाजी महाराजांचे सरदार सर्जेराव जेधे आणि सर्जेराव जेधे यांच्या पदरी असणारे त्यांचे लोक अशी उभी राज्य मांडणी असताना जेध्यांची माणसं त्यांच्या कडून थेट महाराजांकडे येत असावी आणि म्हणून सर्जेरावांनी महाराजांना पत्र लिहिले असावे. त्या पत्राचे हे उत्तर शिवाजी महाराजांनी दिले आहे. सदर पत्रात फुटून आलेल्या लोकांना नोकरीवर ठेवणार नाही असे आश्वासन महाराजांनी दिलेले आहे. या वरून हे समजते की नोकरी बदलणे म्हणजे प्रत्येक वेळी पक्ष किंवा स्वामी बदलणे असे नसून एकाच सत्तेखाली अथवा स्वामीत्वा खाली देखील लोक चाकरी बदलत होते.

सर्जेराव जेधे यांना पत्र

सर्जेराव जेधे यांना पत्र

भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

13892030_10154416353378588_1382593773319092255_n

भगतसिंह यांचे बटुकेश्वर दत्त यांना पत्र

सेंट्रल जेल,लाहोर
ऑक्टोबर,1930

प्रिय बंधू,

मला शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसा फाशीचा आदेश हि देण्यात आला आहे.या कोठड्यामध्ये माझ्या खेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे आणखी खूप आहेत. ते लोक हीच प्रार्थना करत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी.परंतु त्यांच्यात बहुधा मीच एक मात्र असा माणूस आहे,कि जो मोठ्या उत्सुकतेने त्या दिवसाची वाट पाहतोय – जेव्हा आपल्या आदर्शांसाठी फासावर लटकण्याचे भाग्य मला मिळेल.

फाशीच्या तख्तावर मी आनंदाने चढेन आणि आपल्या आदर्शांसाठी क्रांतिकारक किती शौर्याने बलिदान देऊ शकतात ,हे जगाला दाखवून देईन.

मला फाशीची शिक्षा झाली आहे,पण तुला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.तू जिवंत राहशील आणि तुला जिवंत राहून जगाला दाखवून द्यायचे आहे, की क्रांतिकारक आपल्या आदर्शा करिता केवळ मृत्यूला कवटाळतात असेच नव्हे; तर जिवंत राहून प्रत्येक संकटाचा सामनाही करू शकतात.मृत्यू हे खडतर ऐहिक जीवनातून सुटका करून घेण्याचे साधन बनता कामा नये.ज्या क्रांतीकारकांना प्रसंग वषात फाशीच्या फंदातुन सुटका मिळाली आहे त्यांनी जिवंत राहून जगाला हे दाखवून दिले पाहिजे,की ते आपल्या आदर्शासाठी केवळ फासावर चढू शकतात असे नव्हे; तर तुरुंगाच्या अंधाऱ्या कोंदट कोठड्यांमध्ये घुसमटून टाकणाऱ्या क्रूर हीनतम दर्जाच्या अत्याचारांना तोंड देखील देऊ शकतात.

तुझा भगतसिंह

(संदर्भ – शाहिद भगतसिंह समग्र वाड्मय, पृष्ठ – 188)

– विशाल खुळे

शिवाजी महाराज – आमच्या ह्या प्रदेशात कल्पनेचा घोडा नाचवणे सुद्धा कठीण आहे.

शिवाजी राजांनी औरंगजेबाच्या सरदाराला एक खरमरित पत्र लिहले यात शिवाजी महाराज म्हणतात  ” गेली तिन वर्षे बादशाहाचे सरदार आमचा प्रदेश काबिज करण्यासाठी येत आहेत, आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा सुद्धा नाचवणे कठीण आहे. मग प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला ”

image

शिवाजी महाराज – बहादुरखान तो पेंडीचे गुरु आहे

शिवाजी राजांच्या पराक्रममुळे त्रस्त झालेल्या औरंगजेबाने त्याचा दुधभाऊ बहादुरखान कोकलताश याला राजांवर स्वारी करण्या साठी नेमले ही बातमी शिवाजी राजांना समजताच राजे म्हणाले ” बहादुरखान पेंडीचे गुरु आहे त्याचा गुमान काय आहे ? त्याला मुलखात यावयास दोन वर्षे लागतील ”

image

शिवाजी महाराज – आमची बिरुदे अष्ट दिशास् लागली आहेत

शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास गेले असताना त्यांनी दक्षिणेत व्यंकोजी राजांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वडिलोपार्जित संपत्ति मधे वाटा मागीतला. राजांची ही मागणी ऐकून व्यंकोजी राजनी तिथून पळ काढला. ही बातमी समजताच शिवाजी राजे म्हणाले ” आम्हास त्या बिरुदांची गरज ती काय, आमची बिरुदे अष्ट दिशास लागली आहेत ” भूमंडळी कीर्ति आपली झाली आहे.

image

संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

शंभूछत्रपतींची संत तुकोबांच्या पुत्राला मोइन

शिवाजी राजांनी संत आणि धर्माचे ज्याप्रमाणे रक्षण आणि प्रतिपालन केले, तोच वारसा पुढे शंभू छत्रपतींनी चालवला.
तुकोबारायांचे चिरंजीव महादोबा यांना दिलेली ही वर्षासनाची मोइन ह्याचे उत्तम उदाहरण आहे.  पत्र १९ ऑगस्ट १६८० रोजी दिलेले असून, मायना शिवराज्याभिषेकानंतर वापरण्यात आलेल्या पत्रांसारखाच आहे.
पत्रात देहू, तुकोबा गोसावी आणि त्यांचे पुत्र महादोबा गोसावी असे स्पष्ट उल्लेख आहेत.

water marks 2

 

शिवाजी महाराज – “हिंदू सेनाधिपति”

हेन्री रेविंगटन चे शिवाजी महाराजांना हिंदू सेनाधिपती म्हणून संबोधणारे पत्र

गेल्या 150 वर्षांमधे शिवाजी महाराज हे कसे आपल्या विचारांचे होते हे सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. यात अमुक समाजाचा शिवाजी, तमुक समाजाचा शिवाजी झाले ! अलीकडच्या काळात तर डावे-उजवे सर्वच विचारधारांचे लिहून झाले आहे.

पण शिवाजी राजांचा संबध हिंदू या शब्दाशी जोडला गेला तर जणू काय खुप मोठे संकट येणार आहे असा आविर्भाव तथाकथित फुरोगामि, फेक्युलर आणतात. पण सत्य हे सत्यच असते, अश्या सर्व फेक्युलर-फुरोगामि लोकांनी खालील पत्रातील उल्लेख वाचावा.

इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो
– “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), म्हणजेच त्याकाळी  देखील इंग्रजांची धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत !

जे त्या इंग्रजाना समजले ते आताच्या फुरोगामि आणि फेक्युलर लोकांना समजत नाही !! दुर्दैव !  दुसरे काय ?

 

water marks3

%d bloggers like this: