अपरिचित इतिहास – भाग तीन – शिवाजी महाराजांचे एक महत्वपूर्ण पत्र

नमस्कार,

छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे राजे होते, रयतेचे राजे होते. गरीब शेतकऱ्यांना, रयतेला सैनिकांकडून जराही त्रास होऊ नये यासाठी शिवाजी महाराज किती दक्ष होते हे या पत्रातून दिसते. हे पत्र शके १५९३, वैशाख पौर्णिमा, इंग्रजी तारीख १९ मे १६७३ रोजी लिहिले गेले आहे. महाराजांनी लोककल्याणासाठी हे राज्य स्थापन केले होते, त्यामध्ये लोकांची, रयतेची, आपल्या स्वजनांची किती आस्थेने काळजी महाराज घेत असत हे या पत्रातून दिसते.

 

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

शिवाजी राजे – हुजूर बाजारामधे थोर थोर साहूकार आणोन ठेवावे

राजाला स्वताचे राज्य चालवताना किती बारीक़ बारीक आघाड्यांवर लक्ष ठेवावे लागते याचा उत्तम आदर्श शिवाजी राजांनी घालून दिलेला आहे.आपल्या राज्यात सावकार लोकांबद्दल आणि दुसऱ्या राज्यातील सावकार यांच्या बद्दल कशी वागणूक ठेवावी हे वरील उल्लेखात दिलेच आहे.

image

शिवाजी राजे – गडावरील पाणी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन राखावे

किल्ल्या वरील पाण्याचे नियोजान कसे करावे, त्याबाबात काय उपाय योजना कराव्यात,संकट समयी त्यावर मात कशी करावी हे शिवाजी राजांनी 300 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. एक राजा किती काटेकोर नियोजन करतो याचे उदाहरण म्हणजे शिवाजी राजे

image

शिवभूषण निनादराव बेडेकर यांची भाषणे

|| शिवदशक ||

छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालावर आधारित शिवभूषण श्री. निनादराव बेडेकर यांची लोकप्रिय भाषणे. 

१. श्रीशिवछत्रपती आणि सह्याद्री

२. श्रीशिवछत्रपती आणि समुद्र व आरमार

३. श्रीशिवछत्रपती आणि कवि राज भूषण 

४. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचा पत्रव्यवहार 

५. श्रीशिवछत्रपती आणि रणसंग्राम

६. श्रीशिवछत्रपती आणि स्वधर्म

७. श्रीशिवछत्रपती आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य / Timeless Management Techniques of Shivaji the Great

८. श्रीशिवचरित्राचे महत्व

९. श्रीशिवछत्रपती आणि महाराष्ट्र धर्म

१०. श्रीशिवछत्रपती आणि भगवान श्रीकृष्ण

सदर भाषणे ही रत्नागिरी, तळेगाव, डोंबिवली, प्रतापगड, पुणे अश्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाली असून, खुद्द निनादरावांकडून गेल्या काही वर्षात मिळवण्यात आली होती.

शिवप्रेमी रसिकांकरिता, एकत्रितपणे उपलब्ध केलेली ही भाषणे म्हणजे एक ऐतिहासिक पर्वणी आहे.

– निनाद रावांच्या स्मृतीस वंदन करून इतिहास प्रेमींच्या सोयीकरिता सादर समर्पित –

गुरुपोर्णिमा २०१५

%d bloggers like this: