अपरिचित इतिहास – भाग दोन – १० महत्वाच्या घडामोडी – पेशवा माधवराव

इतिहास प्रेमी रसिकहो !

नमस्कार,

YouTube वरील आमच्या Channel च्या माध्यमातून आम्ही नवीन पिढीसमोर इतिहास नव्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय.
प्रस्तुत आहे अपरिचित इतिहास या आमच्या मराठी मालिकेतील भाग दुसरा – १० महत्वाच्या घडामोडी : पेशवा माधवराव.

आपल्याला मराठेशाहीतील एखाद्या विषयाबद्दल अथवा एखाद्या घटनेबद्दल अधिक उत्सुकता आहे का?
आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्यावर व्हिडियो बनवण्याचा प्रयत्न करू.
आपल्याला आमचा हा प्रयत्न कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपले प्रेम हाच आमचा खरा खजिना आहे !

आमच्या YouTube Channel ला नक्की Subscribe करा !!

धन्यवाद.

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

यस्याश्वा तस्य राज्यं ।

मध्ययुगीन इतिहासात घोड्यांना अनन्य साधारण महत्व होते. घोड्यांची निगा राखणे, उत्तम जातिवंत घोडी खरेदी करणे हा रोजच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक होता. खुद्द शिवाजी राजे आपल्या घोड्यांच्या पागेत जाऊन रोज एक श्लोक म्हणत असत असे ९१ कलमी बखरीत नोंद केलेले आहे. –

यस्याश्वा तस्य राज्यं ।
यस्याश्वा तस्य मेदिनी ।
यस्याश्वा तस्य सौख्यं ।
यस्याश्वा तस्य सामराज्यं ।।

एकदा सरसेनापती हंबीरराव यांनी कनकगिरीच्या पाळेगाराकडून  काही शिंगर विकत घेतली होती. वळीवाच्या पावसात ती भिजली. महाराजांना ही बातमी समजताच त्यांनी मुजुमदार अनाजी मलकरे आणि हंबीरराव यांची चांगलीच फजिती केली होती. मुजुमदारांना १२५ होन जमा करायला सांगितले आणि पुढे याच शिंगरांची काळजी घ्यावी आणि त्यावर पागेचा डाग द्यावा म्हणून त्यांनी हुकूमही केला होता.

पानिपतच्या लढाईपूर्वी तमासा नावाच्या संसर्गजन्य रोगाने १० हजार घोडी मृत्युमुखी पडली होती. आजच्या प्रस्तुत नोंदी ह्या पेशवे काळातील यादी असून त्यातून घोड्यांच्या तसेच इतर जनावरांच्या आजारावर कसा इलाज केला जात असे याचे उल्लेख आहेत. उंट माती खाऊ लागल्यास काय करावे, गाई, घोड्याचे पाय मोडल्यास त्याचा इलाज, म्हशीच्या शिंगांचा औषधी उपयोग अश्या अनेक चमत्कारिक नोंदी तुळशीबागवाले दफ्तरात सापडल्या.

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

पेशवे काळातील घोड्यांच्या इलाजांची नोंद

राजकीय इतिहासाच्या चर्चेत या व्यावहारिक नोंदी इतिहासात कुठेतरी हरवून जातात. त्याच लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न.

इतिहासाच्या पाऊलखुणा – पेशवाई – झंझावात

पुस्तक प्रकाशन सोहळा

पुस्तक प्रकाशन सोहळा

नमस्कार वाचकहो !

आपले प्रेम आणि स्नेहाच्या बळावर आम्ही आमचे पुढचे पाऊल दिमाखात टाकले. दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी राफ्टर पब्लिकेशन्सच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आणि पेशवाई या दोनीही पुस्तकांचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे आणि ज्येष्ठ खगोल तज्ञ श्री. मोहनराव आपटे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. राफ्टर पब्लिकेशन्स आणि जनसेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दिमाखात पार पडला. पार्ले टिळक विद्यालय असोसिअशन च्या महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयाच्या केशवराव घैसास सभागृहामध्ये हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. रसिक जाणकार वाचक श्रोत्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाऊन नवीन पुस्तकांचे स्वागत केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे व लेखकांचे गुरु डॉ.सदाशिव शिवदे यांनी तसेच जेष्ठ अभ्यासक श्री.मोहन आपटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकाशक श्री. उमेश जोशी यांनी ही दोन पुस्तके प्रकाशित करण्यामागची आपली भूमिका मांडली. तसेच पेशवाई चे लेखक श्री. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी पेशवे काळातील मोडी पत्रे या विषयावर Presentation दिले. या सर्व प्रकाशन सोहळ्यास उपस्थितांनी उत्तम प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.अनघा मोडक यांनी उत्तमरित्या केले.

इतिहासाच्या पाऊलखुणा अनावरण

इतिहासाच्या पाऊलखुणा अनावरण

पेशवाई अनावरण

पेशवाई अनावरण

डॉ. शिवदे - आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप

डॉ. शिवदे – आमच्या गुरूंकडून पाठीवर कौतुकाची थाप

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ श्री. आपटे सर - चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक

ज्येष्ठ खगोल तज्ञ  श्री. आपटे सर – चिकित्सक आणि संशोधनात्मक लेखनाचे कौतुक

????????????????????????????????????

उपस्थित रसिक वाचकांशी संवाद साधताना राफ्टर पब्लिकेशन्स चे श्री. उमेश जोशी.

उद्घाटनाच्या दिवशी तिथे उपलब्ध असलेल्या सर्व प्रती हातोहात संपल्या हे आपले प्रेम आणि आपुलकी मुळेच शक्य झाले.ब्लॉगच्या निमित्ताने एरवी प्रतिक्रियातून भेटणाऱ्या तुम्हा वाचकांपैकी काही जणांशी प्रत्यक्ष भेटी झाल्या. आपल्याला भेटून आम्हाला आनंद झाला.

आमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत

आमचा इतिहास मित्र परिवार आणि वाचक वर्ग उपस्थित म्हणजे आनंद द्विगुणीत

श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद

श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद

रत्नागिरीतील पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्रभूषण आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत परंतु त्यांची भेट घेताच त्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद मिळाले हे अहोभाग्य! आदरणीय बाबासाहेबांनी मलिक अंबरच्या योगदानाची इतिहासाने दाखल घेतली गेली नसल्याचे आणि त्यामुळे आमचा पाहिलाच लेख खूप आवडल्याचे मनमोकळेपणे सांगितले. आम्ही आमचा अभ्यास पुढे असाच सुरु ठेवावा आणि इतिहासातील लपलेले अनेक दुवे लोकांसमोर आणावे म्हणून शुभेच्छा दिल्या.

साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढे १५ ते १८ जानेवारी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपण सर्व इतिहासप्रेमी रसिक वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व दोन्हीही पुस्तकांची प्रकाशकाकडील पहिली आवृत्ती हातोहात संपली.

आपले प्रेम आणि सहयोग असाच मिळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. इतिहासाच्या पाऊलखुणा या आमच्या ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या दुसऱ्या खंडाचे कामही लेखकांनी सुरु केले आहे. दोन्हीही पुस्तकांची सुधारित द्वितीय आवृत्तीचे कामही सुरु आहे.

तर सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्‍स्‌ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..

“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) –

इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहासाच्या पाऊलखुणा

आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी विशाल खुळे, प्रणव महाजन, उमेश जोशी, योगेश गायकर, शिवराम कार्लेकर, रोहित पवार आणि कौस्तुभ कस्तुरे या तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या. अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स तर्फे आपल्याला सादर. या लेखसंग्रहात गनिमी काव्याचा प्रणेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिक अंबर या सिद्दी निजामशाही सरदाराच्या व्यक्तीचित्रापासून ते मराठेशाहीचा कळस म्हणजेच अटकेवर फडकलेला जरीपटका या मोठ्या कालखंडावर लेख आहेत.

“पेशवाई” – महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान –

पेशवाई

पेशवाई

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स आपल्यासमोर घेऊन आले आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत.

झंझावात

झंझावात

“झंझावात” – मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा –

|| चतुर्थ अवृत्ती लोकार्पण ||

जुलै २०१३ साली प्रकाशीत झालेले झंजावात हे गुरुवर्य निनादराव बेडेकर यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले ऐतिहासिक पुस्तक. अंधारातील इतिहासातील उजेडात आणणारे बेडेकर यांचे हे लेखन. विस्मृतीत गेलेला महाराष्ट्राबाहेरील मराठी पराक्रमाचा हा इतिहास आहे. मराठी फौजांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या अतुलनीय पराक्रमाची ही गाथा आहे. जयपूरला धडक, सूरत मार्गावरील चौक्या, गुजरातेत मराठे, ग्वाल्हेर काबीज, उज्जैन, आमझेरा आदी प्रकरणांमधून तो उलगडत जातो. लाहोर, पेशावर, दिल्ली, जबलपूर, विजापूर, गुलबर्गा, झांशी, जुनागढ, कोटा आदी ठिकाणी मराठ्यांनी गाजवलेल्या अतुलनीय पराक्रमाची सखोल माहिती मिळते.

इतिहासाच्या पाऊलखुणा, पेशवाई या पुस्तकांच्या पहिल्या आवृत्तीतील आणि गुरुवर्य निनादराव बेडेकर लिखित झंझावात या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीतील अगदी काही मोजक्या प्रती सध्या amazon.in वर शिल्लक आहेत ज्या आपण पुस्तकांच्या मुखपृष्ठावर Click करून मागवू शकाल.

बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !

– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा ! … लवकरच आपल्या भेटीला.

नमस्कार वाचकहो !

ब्लॉगवरील लिखाणाचे हक्क राफ्टर पब्लिकेशनने घेतल्याचे आम्ही मागे कळवले होतेच. आपले प्रेम आणि पाठिंब्याच्या जोरावर आमची पुढची पायरी …

Event Details Ad

सादर करीत आहोत – राफ्टर पब्लिकेशन्‍स्‌ची दोन नवीन ऐतिहासिक पुस्तके..

“इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” (ऐतिहासिक लेखसंग्रह) :

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा !

इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा !

“इतिहास” !! आज इतिहास म्हटलं की सर्वसामान्यांना नकोसा झालेला विषय. आधीच शाळेपासून सन-सनावळ्या आणि युद्धांमध्ये गुंतलेला इतिहास सध्या तर राजकारणी आणि जातियवादी लोकांमूळे जनसामान्यांना अक्षरशः नको वाटू लागला आहे. मग अशातच अनेकांचे फावते आणि इतिहास सोयीसाठी वापरला जातो. अनभिज्ञ तरुणांना न घडलेल्या गोष्टी सांगून पद्धतशीरपणे डिवचले जाते. यामूळेच हे सर्व रोखण्यासाठी काही तरुण अभ्यासकांनी आपल्या दैदिप्यमान इतिहासाच्या पाऊलखुणा आणि मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा आपल्या लेखणीने संदर्भासह सजवण्याचा वसा घेतला आणि मग एक अमुल्य लेखसंग्रह सजला तोच “इतिहासाच्या पाऊलखुणा”. सदर लेखसंग्रहात आजपर्यंत मांडल्या गेलेल्या काही घटनांचीच एक वेगळी बाजू आपल्याला पहावयास मिळेल. काही घटना इतिहासकारांच्या ‘दृष्टीकोना’च्या बळी पडल्या, तर काही घटना ‘नजरचूकीने’ राहिलेल्या पुराव्यांवाचून मांडल्या गेल्या.अशा घटानांची संगती लावून, “इतिहासाच्या पाऊलखुणा – मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा” हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला लेखसंग्रह राफ्टर पब्लिकेशन्‍स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.

“पेशवाई” :

पेशवाई - महाराष्ट्राच्या इतिहासातले एक सुवर्णपान !

पेशवाई – महाराष्ट्राच्या इतिहासातले एक सुवर्णपान !

पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच ! कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या पुढच्या वंशजांनी स्वराज्यकार्यात आपले आयुष्य झोकून दिले. बाळाजीपंतांनंतर भट घराण्यातील चार पिढयांनी समर्थांच्या “शक्ती-युक्ती जये ठायी” प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत “सिंधू नदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा” हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. या पेशवाईचा एक संक्षिप्त आढावा म्हणजे “पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान” !! कौस्तुभ कस्तुरे लिखित हे पुस्तक राफ्टर पब्लिकेशन्‍स लवकरच आपल्यासमोर घेऊन येत आहे.. या पुस्तकात शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्यापासून ते शेवटचे पेशवे बाजीराव रघुनाथ इंग्रजांना शरण गेले तोपर्यंतचा कालखंड आणि त्यातील पेशवाईशी निगडीत घटना चितारण्यात आल्या आहेत. हा ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहीलेला ग्रंथ राफ्टर पब्लिकेशन्‍स दि. १९ डिसेंबर २०१५ रोजी आपल्यासमोर घेऊन येत आहे.

तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण कार्यक्रमाची शोभा वाढवावी !

Bookstore Details - Ad

बहुत काय लिहीणे ? आमचे अगत्य असु द्यावे.. धन्यवाद !

– लेखक, प्रकाशक आणि मित्रवर्ग –

गरुड भरारी…!!!

प्रताप सूर्य थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी पालखेड मोहिमेवर असताना केलेला प्रवास पहिला तर मन थक्क होतं. दळणवळणाची आजच्यासारखी साधने उपलब्ध नसताना, आजच्या सारखे express highway नसताना, केवळ आपल्या नजरबाजांवर, हेरांवर पूर्ण विश्वास ठेऊन भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून मोहिमा आखण म्हणजे ह्या वीरांच्या युद्धकौशल्याची परिसीमाच म्हणायची…!

केवळ जीवाभावाच्या साथीदारांवर पूर्ण विश्वास ठेऊन मोठमोठ्या लढाया मारणारे बाजीराव पेशवे ह्यांनी  पालखेडच्या  लढाईत निजामाला पाठलागावर ठेऊन, झुकांड्या देऊन पालखेड ला गाठून सपशेल पराभूत केले. सच्चा शिपायाला जात नसते, आपल्या राजाच्या चरणी निष्ठा आणि आपल्या राज्यावर वक्र दृष्टी टाकणाऱ्या शत्रूला रणांगणात धूळ चारणे या दोनच गोष्टी त्यांना माहित असतात. “मराठ्यांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम” या पुस्तकातील पालखेड युद्धा दरम्यानच्या मराठी फौजेच्या घोड दौडीच्या या नोंदी बघितल्या कि  थोरल्या बाजीराव पेशवे (राया, राऊ ) यांचा पराक्रम जातीत तोलणाऱ्या “विचारजंतांची” कीव येते.

Rau

%d bloggers like this: