थोरल्या बाजीरावांची दिल्ली धडक

आपल्या २० वर्षांच्या वादळी कारकिर्दीत थोरल्या बाजीराव साहेबांनी काही अचाट धैर्य केली. त्यातील एक होते थेट दिल्लीवर चढाई करणे. १७३७ साली सादतखानावर केलेली ही चढाई इतिहास प्रसिद्ध आहे. ह्या स्वारी बद्दल थेट राउंनीच अप्पांना पत्र लिहून कळवले होते. हे पत्र त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वपूर्ण ठरावे असेच आहे. पत्रातील एक वाक्य तर कायम स्मरणात रहावे असे आहे, त्यावरून त्या काळातील राजकारणावर भरपूर प्रकाश पडतो – “दिल्ली महास्थळ, अमर्याद केल्यास राजकारणाचा दोर तुटतो”.

इतिहास प्रेमींच्या अभ्यासाकरिता सदर पत्र संपूर्ण उपलब्ध करत आहोत. पत्र जरा लांबलचक आहे परंतु अत्यंत महत्वाचे आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मुद्दाम अधोरेखित केले आहेत. वाचकांनी हे पत्र जरुर वाचावे.

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

थोरल्या बाजीरावांचे चिमाजी अप्पांना पत्र

संभाजी महाराज – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजे – आपण हिंदू काय तत्वशून्य झाले आहोत काय ?

संभाजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याच्या मुलास म्हणजे रामसिंगास जे पत्र लिहले त्यातच हे वरील दिलेले वाक्य आहे. यात आपण सर्व हिंदू राजांनी एकत्र येऊन दिल्लीपति बादशाह च्या विरुद्ध लढ़ा दिला पाहिजे असे संभाजी राजे सांगत आहेत. संभाजी राजांची स्वताच्या धर्माबद्दल जी काही धारणा आहे ती शब्दा शब्दातुन व्यक्त होते. यात संभाजी राजे म्हणतात –
” आपण हिंदू काय दुबळे, तत्वहीन झालो आहोत ? आपल्या देवालायांची मोड़ तोड़ झाली तरी स्वधर्म रक्षण करण्यास असमर्थ आहोत,धर्माचरण शुन्य आहोत अशी त्या यवन बादशाहची समजूत झाली आहे. अश्या वेळी आपण एक होऊन त्या यवनाला तुरुंगात डांबले पाहिजे. देवालय स्थापन करुन धर्माचे रक्षण केले पाहिजे ”

पचेल का हे आताच्या फेक्युलर लोकांना ? की ह्याला पण खोटा इतिहास बोलणार ? कारण यात हिंदू हा शब्द आला आहे.

Sambhaji Raje

 

%d bloggers like this: