महाराजांचे सतर्क जासूद आणि प्रजाप्रेमी महाराज

शिवाजी महाराज स्वराज्यातील लोकांच्या संरक्षणासाठी किती दक्ष असत हे खालील पत्रावरून दिसून येते.
मुघलांच्या हालचाली महाराजांचे हेर त्यांना टाकोटाक देत असत असे या पत्रावरून समजते.
सदर पत्र शिवाजी महाराजांनी सर्जेराव जेधे यांना लिहलेले आहे. यात महाराजांची वाक्य बरेच काही सांगून जातात.
कामास हैगै न करणे, कामास एक घडीचा दिरंगा न करणे, आपल्या जागी तुम्ही हुशार असणे.

sarjerao-2

शिवाजी महाराजांचे सर्जेराव जेधे यांना पत्र

मध्ययुगीन इतिहासात आपण अनेकदा पाहतो ते सरदारांचे एका सत्तेकडून दुसऱ्या सत्तेकडे जाणे. बहुतांश वेळा या सत्ता एकमेकांच्या विरोधात असत पण आज प्रस्तुत करत असलेले हे पत्र त्या अर्थाने वेगळे आहे. शिवाजी महाराजांचे सरदार सर्जेराव जेधे आणि सर्जेराव जेधे यांच्या पदरी असणारे त्यांचे लोक अशी उभी राज्य मांडणी असताना जेध्यांची माणसं त्यांच्या कडून थेट महाराजांकडे येत असावी आणि म्हणून सर्जेरावांनी महाराजांना पत्र लिहिले असावे. त्या पत्राचे हे उत्तर शिवाजी महाराजांनी दिले आहे. सदर पत्रात फुटून आलेल्या लोकांना नोकरीवर ठेवणार नाही असे आश्वासन महाराजांनी दिलेले आहे. या वरून हे समजते की नोकरी बदलणे म्हणजे प्रत्येक वेळी पक्ष किंवा स्वामी बदलणे असे नसून एकाच सत्तेखाली अथवा स्वामीत्वा खाली देखील लोक चाकरी बदलत होते.

सर्जेराव जेधे यांना पत्र

सर्जेराव जेधे यांना पत्र

राजाराम महाराज – ‘तुम्ही लोक मनावरी धरिता गनीम तो काय आहे’

१६९० हे वर्ष मोठे धामधुमीचे होते. औरंगजेब नावाचा महाशत्रू महाराष्ट्रावर चालून आला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या शतकांचा वारसा असलेल्या शाह्या तो एका घासत गिळंकृत करणार होता. अश्या पार्श्वभूमीवर राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले हे पत्र मोठे महत्वाचे आणि स्वराज्य सांभाळण्याच्यासाठी केलेल्या खटपटीचे द्योतक आहे. जेधे या दरम्यान बहुदा मुघलांचा पक्ष स्वीकारणार असावे असे राजाराम महाराजांना कळले असावे म्हणून त्यांची समजूत घालून त्यांना स्वराज्यात टिकवण्याची धडपड पत्रात केलेली दिसते. पत्रात आजच्या महाराष्ट्राचा पूर्वज ‘मऱ्हाट राज्य’ नावाने दिसतो. इतर मुख्य आलेल्या गोष्टी म्हणजे जेध्यांना महाराष्ट्र देशात राजकारण करावे (लोक आपल्या बाजूने मिळवावे) तसेच चाललेल्या हालचाली कळवाव्या कारण ‘तुम्ही लोक ह्या राज्याची पोटतिडीक धरिता’ असे राजाराम महाराज लिहितात. स्वराज्यावर आलेल्या संकटाच्या वेळी स्वामींच्या पायाशी एकनिष्ठ राहावे असे कळवतात. औरंगजेबा सारखा प्रबळ ‘गनीम’ राज्यावर आला असूनही राजाराम महाराजांना खात्री आहे की ‘तुम्ही (स्वराज्याचे मावळे) लोक मनावर धरिता तर गनीम तो काय आहे? त्या औरंगजेबाचा हिसाब न धरावा’. नेतोजी पालकरांना तसेच इतरही लोकांना औरंगजेबाने बाटवले ह्याचा स्पष्ट उल्लेख पत्रात आहे. अखेरीस ‘ईश्वर’ करितो ते फते (विजय) आपलाच आहे असा आत्मविश्वासही पत्रात दिसून येतो. अभ्यासकांनी जरूर अभ्यासावे असे हे महत्वाचे पत्र आहे.

मूळ संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने – खंड १५ (जुना) – लेखांक ३४७

राजाराम महाराज यांचे बाजी 'सर्जेराव' जेधे यांना लिहिलेले पत्र

राजाराम महाराज यांचे बाजी ‘सर्जेराव’ जेधे यांना लिहिलेले पत्र

जेधे शकावली

जेधे शकावली ही श्री सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांच्याकडून लोकमान्य टिळकांना मिळाली होती. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात श्री पटवर्धन यांना भेटून त्यातील मित्या तपासून घेतल्या. शकावली उभ्या अरुंद पोर्तुगीज कागदावर लिहिली गेली आहे. २२ पूर्ण आणि तेविसावे अपूर्ण पान मुळ प्रतीत पाहायला मिळते. औरंजेबाच्या जन्मापासून ते मोगलांनी चंदी उर्फ जिंजी ताब्यात घेण्यापर्यंतच्या नोंदी शकावलीत आढळतात. लेखनाच्या शैलीवरून टिळकांनी शकावलीची प्रत पूर्व पेशवाईत तयार झाली असावी असा अंदाज केला होता. इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठांच्या इतिहासाची साधने खंड १८ (जुना) मध्ये लेखांक ५ म्हणून छापलेल्या शकावलीच्या नोंदी आणि प्रस्तुत शकावलीच्या नोंदी जुळतात. शकावलीने उजेडात आणलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींपैकी शिवजन्माची मिती, अफजल वधा संबंधी अधिक माहिती आणि पोवाड्याचे शेवटचे चरण, नेतोजी पालकर यांचे धर्मांतर आणि शुद्धी या महत्वाच्या म्हणाव्या लागतील. भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रसिद्ध केलेल्या शिवचरित्रप्रदीप या पुस्तकात शकावली समाविष्ट केली होती. सदर पुस्तक डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया च्या विद्यमाने आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Download Link : जेधे शकावली

%d bloggers like this: