दर्याराज कान्होजी आंग्रे…. “समुद्रावरील शिवाजी”

जेम्स डग्लस यांच्या “Book Of Bombay” पुस्तकातील हा उतारा वाचून सहज लक्षात येते की सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या आरमाराचा दबदबा किती विलक्षण होता. इंग्रज, फ्रेंच, सिद्दी, मुघल एकेकटे किंवा एकमेकांच्या मदतीने वारंवार कान्होजींना शह देण्याच्या प्रयत्नात होते, आणि कान्होजी त्यांना प्रत्येक वेळी खडे चारत होते. कधी युद्ध करून कधी तह करून कान्होजीनी त्यांना कधीही संपूर्ण विजय मिळू दिला नाही. जेम्स डग्लस ह्यांचा हा उतारा वाचला की हे जलचर कान्होजींना किती वचकून होते हे दिसून येते. फक्त मराठी आरमाराशी लढण्यासाठी त्यांना वेगळी तरतूद करावी लागत असे या वाक्यात इंग्रजांची हतबलता किंवा व्यथा दिसते.

अनेक ठिकाणी कान्होजींच्या सैन्याला “शिवाजीचे सैन्य” संबोधल्याचे उल्लेख आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा दरारा तसा होताच….. पुढे छत्रपती शाहू महाराजांचे सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी तो दरारा दबदबा समुद्रावर पसरवला. कुठे समकालीन अस्सल पत्रांमध्ये उल्लेख नसला तरी काही जाणकार इतिहास संशोधक मंडळी त्यांना दर्यावारचा शिवाजी म्हणतात. कान्होजी आंग्रे ह्यांचा जीवन पट अभ्यासला तर त्यांना “दर्यावरचे शिवाजी” किंवा “समुद्रावरचे शिवाजी” म्हटले तर काहीही वावगं ठरणार नाही…..!!   Kanhoji